Subscribe Us

शालेय पोषण आहार योजना सविस्तर माहिती

 


          प्राथमिक शिक्षण संचालनालय

          शालेय पोषण आहार योजना

• योजनेस सुरवात दिनांक 22 नोव्हेंबर, 1995.

शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यात सदर योजना 22 नोव्हेंबर, 1995 पासून राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या योजने अंतर्गत इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना प्रति महा 3 किलो प्रमाणे मोफत तांदूळ देण्यात येत होता. (Take Home Supplement) सन 2001 मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ न देता शाळेमध्ये अन्न शिजवून द्यावे असे आदेश दिले व त्यानुसार सन 2002 पासून या योजनेचे स्वरूप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेला आहार देण्यात येतो. सन 2008 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला असून इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येतो.

योजनेची ठळक वैशिष्टे

* प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणे.

* प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविणे.

* शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविणे.

* भेदभाव नष्ट करणे.

* विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.

• राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळा,मदरसा / मक्तबा, राष्ट्रीय बालकामगार शाळेतील विदयार्थी (NCLP शाळेतील विदयार्थ्यांना उच्च प्राथमिक नुसार लाभ) इ. ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो.

शालेय पोषण आहार योजनेबद्दल सविस्तर माहिती वाचण्यासाठी व PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

CLICK HERE 


Post a Comment

0 Comments